-
सध्या देशात सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी या दोन नावांची खूप चर्चा होते आहे. (Photo: Social Media)
-
यामागचं कारण म्हणजे मध्य प्रदेशमधलं हे जोडपं लग्नानंतर हनिमूनला मेघालयला पोहोचलं होत. (Photo: Social Media)
-
या दरम्यान राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर गेल्या आठवड्यात राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला होता. (Photo: Social Media)
-
पण पत्नी सोनमचा काहीच पत्ता लागत नसल्याने तिनेच पतीची हत्या केलाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. (Photo: Social Media)
-
दरम्यान सोनमच्या अटकेनंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. (Photo: Social Media)
-
या अटकेनंतर सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहच्या बहिणीने तिचा भाऊ निर्दोष असल्याचे सांगत त्याला सोडण्याची मागणी केली आहे. ती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होती. (Photo: Social Media)
-
याचवेळी सारखीच मागणी राज कुशवाहच्या आईनेही केली आहे. यावेळी दोघींनाही अश्रू अनावर झाले होते. (Photo: ANI)
-
काय म्हणाली बहीण?
“विकी आणि राज दोघेही माझे भाऊ आहेत. ते कधीही असे काही करू शकत नाहीत. माझा भाऊ राज कुठेही गेला नव्हता. तुम्ही त्याच्या ऑफिसमधील लोकांनाही विचारू शकता.” (Photo: ANI) -
पुढे बोलताना ती म्हणाली, “माझी एकच मागणी आहे, माझ्या भावाला सोडण्यात यावे. तो हत्येत सहभागी नाही. माझा भाऊ निर्दोष आहे.” (Photo: ANI) हेही पाहा- लग्न कसे आणि कुठे झाले, पत्नी काय करते? सर्वांना पडलेल्या प्रश्नांची खान सरांनीच दिली उत्तरं…

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर